सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

बनावट कागदपञ तयार करून बिल घेतले ?वाघाळा ग्रामपंचायतचे जिल्हाधिकार्याना निवेदन


तळणी  प्रतिनिधी रवी पाटील 
  येथून जवळच असलेल्या मौजे वाघाळा येथील सन २०१८ -१९ मध्ये गौण खणिज लिलावा अतर्गत ग्रामपंचायतीना मिळणारा दहा टक्के लाभाच्या रकमेतून वाघाळा येथील पाणीपूरवठा योजनेसाठी दहा लाख एकावन हजार रुपयांचा निधी शासनाकडून प्राप्त झाला होता . परतू संबंधीत यञणेने बनावट कागदपत्राच्या आधारावर प्रत्यक्ष्य काम न करता यापैकी पाच लाख पच्चवीस हजार रुपये उचलून घेतले आहेत उर्वरीत रक्कम ही आज ही ग्रामपंचायतच्या खात्यावर जमा आहे सबंधीत यञणेने आधीचे काम न केल्याने आता ग्रामपंचायतला खात्यावर असलेल्या रकमेमधून हे काम करण्यास मोठी अडचण येत आहे नियमा प्रमाणे संबंधीत एजन्सी ला हे काम पूर्ण करुन देने बंधन कारक आहे ग्रामपंचातच्या वैतीरीक्त ही एजन्सी असल्याने ग्रामपंचायत ला या कामासाठी अनेक अडचणी येत आहेत संदरील एजन्सी राजकुमार जनार्धन बोराडे या नावाने असून याच एजन्सीने हे बील उचलून घेतले असून उचललेले बील त्या एजन्सी कडून वसुल करण्यासाठी जिल्हाधीकार्यानी योग्य ती कारवाई करावी व सबंधीत एजन्सीला काळ्या यादीत टाकण्याची मागणी सरंपच सुनील कांगणे , सिताराम ठाकरे , भिकाजी कांगने , उर्मिला बोडे , व सर्व ग्रामपंचायत सदस्यानी जिल्हाधीकारी यांना निवेदना द्वारे मागणी केली आहे

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत