सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

मनुष्याने परमार्थ हा स्वःतच्या कल्याणा करता केला पाहीजे -ह भ प रामभाऊ महाराज राऊत

तळणी प्रतिनिधी रवी पाटील 
   येथुन जवळच असलेल्या बन येथे श्री संत भगवान बाबा व श्री संत वामन भाऊ यांच्या पूण्यतिथी निमित्य सात दिवसीय अखड हरीनाम सप्ताह ची सांगता काल ह भ प रामभाऊ महाराज राऊत आंळदी यांच्या काल्याच्या किर्तनाने सांगता झाली 

जगदगूरू श्रीमंत तुकाराम महाराज यांच्या माझे गडी कोण कोन 
निवडा भिन्न यातुनी I
आपआपणामध्ये मिळो |
एक खेळो एकाशी ॥धा
या अभगवावर महाराजांनी चितन केले मनुष्याने परमार्थ हा स्वःतच्या कल्याणा करता केला पाहीजे दुसर्याना तो दाखवण्यासाठी करु नये परमार्थीक चितंन चितं नच मनुष्याच्या उद्धाराचे साधन आहे . मोठया मनुष्याजवळ आल्यावर मनुष्याने नम्रतेने आले पाहीजे श्रीमंत जगदगुरू तुकाराम महाराजांनी . भगवंताला गोपाळाना उद्देशून केलेली सूचना आणि त्या सू


चनेचा भाव व्यक्त केला आहे ।भगवंताने जिथे अवतार घेतला ति जागा मथुरा होती भगवंताला मथूरेतून गोकूळात याव लागल . नंदाच्या घरी घेऊन जा म्हणून याचा साक्षात्कार वासुदेवाला झाला . 
तुकोबारायांचे अभंग म्हणजे जिवनाचे फलित आहे त्यांचा भाव समजुन घ्या आणि स्वःत उध्दार करून घ्या चारशे वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला . आहे . प्रत्येक अभंगाचा भाव समजायला आपले आयुष्य देखील कमी पडेल .मनुष्यान व्यावहारीक जीवनात कितीही काटे मारले तरी त्याच्या प्रारब्धात जेवढे मिळायचे तेवढेच मिळणार फक्त काटा मारण्याच पाप क्रीया मानात जमा झाल्याशिवाय राहणार नाही 

मनुष्याने जीवन जगत असताना सावधान असले पाहीजे लोभामुळे दुसर्यावर अन्याय करून अधिक मिळवण्याचा प्रयत्न करु नये कारण शास्त्राचा सिद्धांत आहे जे प्रारब्धात आहे तेवढे मिळणारच . तुम्ही कितीही विहीत मार्गाने जरी मिळवीले तरी सुध्दा प्रारब्धा पेक्षा जास्त मिळू शकत नाही निशिध्द मार्गाने मिळवण्याचा प्रयत्न केला तरी सुध्दा प्रारब्धात आहे तेवढेच मिळणार तुम्ही विशीष्ट मार्गाने मिळवण्याचा प्रयत्न केलाच तर पाप झाल्याशिवाय राहणार नाही 

ज्याच्या गळ्यात पविञ तुळशीच्या माळा आहेत त्यानी तरी पाप पुण्याचा विचार करणे गरजेचे आहे जे स्वःत ज्ञानोबा तुकोबा संत भगवान बाबा वामन भाऊ यांचे अनुयाई समजतात त्यानी तरी पाप पूण्याचा विचार करावा 

देव गोकुळात आल्यावार खेळण्यात दंग होते कारण त्या खेळण्यात देव आहे .व खेळण्यातच देव आहे त्या खेळण्यात पैसा नाही ज्या गोष्टीत पैसा येतो त्यात आंनद येत नाही कलयुगात पैशाचे प्रारब्ध वाढले आहे कोणत्याही क्षेत्रात पैश्यावाचून राहीले नाही पूर्वी जीवनात पैश्याला महत्व नसायचे ज्याच्या जीवनात पैश्याला महत्व आहे त्याच्या जीवनाच आंनद नाही असे महाराजांनी सांगीतले 

राऊत बाबा याचे कीर्तन म्हणजे एक पर्वणीच असते बन सारख्या छोट्या गावात महारांजानी सेवा दिल्याने पंचक्रोशीतील नागरीकांनी तुफान गर्दी या कीर्तनासाठी केली होती

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत