सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

संत सेवालाल महाराज बंजारा तांडा समृध्दी योजनेच्या माध्यमातून बंजारा तांड्यांचा कायापालट होण्यास मदत होणार आहे सरपंच सीताराम राठोड ,भारतीय जनता पार्टी चे सरपंच सीताराम राठोड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माजी मंत्री आमदार बबनरावजी लोणीकर यांचे मानले आभार



परतूर प्रतिनिधी कैलास चव्हाण
    राज्यात संत सेवालाल महाराज बंजारा, तांडा समृध्दी योजना राबविण्यास आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील बंजारा, समाजाच्या तांड्यांचा विकास होणार आहे.

या योजनेच्या माध्यमातून तांड्यात पाणी, वीज, शाळा, अंगणवाडी, आरोग्य पथदिव्य, गटारे, अंतर्गत रस्ते इत्यादी मूलभूत सुविधा उपलब्ध होणार आहेत. या कामांसाठी किमान 30 लाख रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. संत सेवालाल महाराज बंजारा, लमाण तांडा समृध्दी योजनेच्या माध्यमातून बंजारा तांड्यांचा कायापालट होण्यास मदत होणार आहे.
या योजनेला राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिल्याबद्दल भारतीय जनता पार्टी चे परतवाडी चे युवा सरपंच सीताराम राठोड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन माजी मंत्री आमदार बबनरावजी लोणीकर यांचे आभार मानले.

“संत सेवालाल महाराज बंजारा,लमाण तांडा समृध्दी योजनेला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्यामुळे राज्यातील बंजारा तांड्याचा कायापालट होण्यास सुरुवात होईल. त्यासह ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी असलेली अंतराची अट शिथिल करण्याचा निर्णय झाला आहे. तसेच बंजारा त्यामुळे आता एक हजार लोकसंख्या असलेल्या बंजारा तांड्यांत नवीन ग्रामपंचायत स्थापन होणार आहे. तसेच राज्यातील बंजारा तांड्यांना महसूली दर्जा प्राप्त होणार आहे.तांड्यातील सर्वसमान्य माणुसही सरपंच होऊ शकणार या माध्यमातून बंजारा समाजात नवीन नेतृत्व उदयास येण्यास हातभार लागेल”, असे मत श्री सरपंच सीताराम राठोड यांनी व्यक्त केले आहे.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत