सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....


 
 परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण
 परतुर तालुक्यातील रायगव्हाण येथे अति उत्साहात सांगता करण्यात आली.
कथा प्रवक्त्या परमपूज्य गुरु माऊली संध्या दीदीजी यांनी तीन दिवशी शिवमहापुराण कथेमध्ये श्रवण , मनन, चिंतन अध्यासन , यावर सविस्तर मार्गदर्शन करून सर्व भाविक भक्तांना शिव महापुराण कथेचे महात्म्य आपल्या रसाळ वाणी मधून पटवून सांगितलेले आहे. तसेच यावेळी गावकऱ्यांच्या वतीने भव्य दिव्य कमळाचे फुल बनवून परमपूज्य माऊलींचे आसन कमळाच्या गादीमध्ये केले होते.विशेष म्हणजे श्रीक्षेत्र तामिळनाडू येथील रामेश्वर मंदिराची रोषणाई करण्यात आली होती. सर्व कार्यक्रमाचे नियोजन माऊली सेवा समिती रायगव्हाण यांनी केले...माऊलींची रायगव्हाण येथील हनुमान मंदिर येथून भव्य दिव्य रथा मधून प्रतन करा माऊली सेवा समितीच्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून आदरणीय श्रद्धा दीदी जी एडवोकेट सुप्रीम कोर्ट नवी दिल्ली यांनी केली. यावेळी सिद्धेश्वर केकांन सह सर्व गावकऱ्यांची उपस्थित होती.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत