सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

समाज माध्यमातही होतोय मतदानाचा जागर


परतूर प्रतिनिधि कैलाश चव्हाण 
 दि.२१ - सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु असून जास्तीत जास्त मतदान व्हावे, मतदानाचा टक्का वाढावा यासाठी निवडणूक विभागाप्रमाणेच आता समाज माध्यमावरही जास्तीत जास्त मतदान करावे याबाबत आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान, मतदान करण्याबाबतचे संदेश समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात झळकू लागले आहेत.व्हॉटसऍपच्या स्टेटसवर मतदान करण्याचे संदेश ठेवले जात आहेत.
    लोकसभा निव्वडणुकीचा पहिला टप्पा १९ एप्रिल रोजी संपला आहे.दुसऱ्या टप्प्यातील मतदान २६ एप्रिल रोजी होणार आहे. परभणी मतदारसंघात येणाऱ्या परतूर विधानसभा मतदारसंघात प्रशासनाच्या वतीने सुरु असलेली निवडणुकीची तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.
   लोकसभा निववडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे, मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रशासनाच्या वतीने आटोकात प्रयत्न केले जात आहेत. शहरातील प्रमुख चौक तसेच गर्दीच्या ठिकाणी बॅनर लावून मतदान करण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे. ' स्विप ' कार्यक्रमांतर्गत बोलक्या बाहुल्याच्या माध्यमातून गर्दीच्या ठिकाणी जाऊन मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या माध्यमातून आतापर्यंत आठवडे बाजार, इदगाह मैदान, प्रमुख चौक व गर्दीच्या ठिकाणी मतदान जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले आहेत.
    लोकांमध्ये मतदान करण्याबाबत आता बऱ्यापैकी जनजागृती झाल्याचे दिसत समाज माध्यमावर देखील आता मतदानाबाबतचे संदेश झळकू लागले आहेत.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत