सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

शेतकऱ्याच्या खात्यात शासनाने दिलेल्या अनुदानाची रक्कम बाबतीत शेतकऱ्यांनी विचारना केली असता जालना शहरातील इंडियन बँकेच्या व्यवस्थापकाने शेतकऱ्याला शिवीगाळ केली-वीजय लहाने


 

जालना प्रतीनिधी नरेश अन्ना
  जालना जिल्ह्य़ात पावसाअभावी नैसर्गिक आपत्तीमुळे पेरणी केलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक कर्जात बुडाला असून, राज्य शासनाकडून मिळणाऱ्या मदतीच्या रकमेच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत राज्य सरकारकडून देण्यात येणार अनुदानाची रक्कम  बँकेच्या व्यवस्थापकाशी बँकेच्या खात्यात जमा झालेल्या रकमेबाबत विचारणा केली असता, बँकेच्या व्यवस्थापकाने शेतकऱ्याला शिवीगाळ केली, त्यामुळे शेतकऱ्याने  वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष  विजय लहाने यांच्या कडे  तक्रार केली  बँक व्यवस्थापकाने केलेल्या अर्वाच्य भाषेबद्दल बोलताना शेतकऱ्याने मदत मागितली, युवक जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांनी बँकेत येऊन बँक व्यवस्थापकाला त्यांच्या ग्राहकांची सेवा करण्याच्या कर्तव्याची आठवण करून दिली. 
   त्यांना सांगितले के आधीची शेतकरी कर्जाच्या बाजारात बुडालेलाअसून शेतकरी वर्ग हताश झालेला है आहे आश्या वेळेस  आपण त्यांना योग्य मर्गदर्शन करावे ना की आर्वाच भाषेत किंवा शिव गाळी करू नये आशी समज दिली

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत