सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

समर्थ विद्यालयात रानभाज्या महोत्सव साजरा.

परतुर प्रतीनीधी कैलाश चव्हाण
   पाटोदा(माव) येथील श्री समर्थ माध्यमिक विद्यालयात रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
     निसर्ग प्रत्येक ऋतुमधे अत्यंत पौष्टिक अशा भाज्या - फळांची निर्मिती करीत असतो. आपल्या पुर्वजांना त्या भाज्या , फळांचे महत्व माहीत होते. ऋतुप्रमाणे भाज्यांचे सेवन केल्या जात होते.

सांप्रत काळात या रानभाज्यांची ओळख नाहीशी होत आहे. त्या सर्व भाज्यांची माहीती तसेच त्यांचे औषधीय गुणधर्म विद्यार्थ्यांना माहित व्हावेत या साठी सदरील महोत्सवाचे आयोजन केले असल्याचे मुख्याध्यापक सुरेश पाटोदकर यांनी सांगितले.
या महोत्सवात विद्यार्थ्यांनी ऊत्साहाने सहभाग घेतला.
 रानभाजी तिचे वैज्ञानिक नाव , आढळ , गुणधर्म ई. माहीतीप्रद पलक तयार करण्यात आलेले होते.
केंद्रप्रमुख श्री शंकर थोटे यांनी ऊपक्रमाचे कौतुक केले व प्रत्येक विद्यार्थ्यांनी आणलेली रानभाजी  ची माहिती करुन घेतली.

याच कार्यक्रमात अगस्त्या फौंडेशनचे श्री राठोडसर व केंद्रप्रमुख श्री थोटेसर यांचे हस्ते बालविवाह प्रतिबंध दुरध्वनी मदत फलकाचे अनावरण करण्यात आले.

दरम्यान भारतमातेच्या प्रतिमेचे पुजन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली.

कार्यक्रमास विद्यार्थी व सर्व कर्मचारी ऊत्साहाने सहभागी झाले होते.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत