सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

समर्थ विद्यालयात छायाचित्रे प्रदर्शन.

परतूर प्रतीनिधी कैलाश चव्हाण
पाटोदा [ माव ]  येथील श्री समर्थ माध्यमिक विद्यालयात विवीध जातींच्या सापांचे छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आहे होते.
  नाग पंचमी या  सणाला नागदेवतेचे पुजण श्रध्देने केले जाते. साप हा शेतकर्यांचा मित्र आहे. पर्यावारणाचे संतुलनासाठी सापांचे महत्व अनन्य साधारण आहे. 
प्रत्येक साप हा विषारी नसतो. आपल्या परिसरात सापडणारे बहुतांश साप हे बिनविषारी असतात. भिती पोटी साप दिसताच त्याची हत्या केली जाते.
   विद्यार्थ्यांना बालवयातच विषारी व बिन विषारी साप ओळखता यावेत. त्यांचा अधिवास , शास्त्रीय व बोली भाषेतिल नाव यांचा परीचय व्हावा या साठी या चित्रमय प्रदर्शनाचे आयोजन केले असल्याचे मुख्याध्यापक सुरेश पाटोदकर यांनी सांगितले .
दरम्यान अनेक गावकर्यांनी प्रदर्शनास भेट देवुन विद्यालयाच्या या ऊपक्रमाचे कौतुक केले.
विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विवीध जातींचे सापांची माहिती लिहुन घेतली. 
 कर्मचारी बंधुनी ऊपक्रमाचे यशस्वीते साठी प्रयत्न केले.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत