सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

न्यू वंडर किड्स इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांची विभागीय आट्या-पाट्या स्पर्धेसाठी निवड.


परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण
शालेय शिक्षण व क्रिडा विभाग महाराष्ट्र राज्य आयोजीत  राज्यस्तरीय शालेय क्रिडा स्पर्धा आट्या-पाट्या स्पर्धेत उत्तम कामगिरी करणाऱ्या न्यू वंडर किड्स इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज परतूर संघाची विभागीय स्तरावर निवड झाली.
झालेल्या निवडी बद्दल संस्थे तर्फे विद्यार्थी व क्रिडा शिक्षक विजय चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला.
सत्करा प्रसंगी कार्याध्यक्ष म्हणाले की, आपली कामगिरी  पाहून आम्हा सर्वांना आपला खुप अभिमान वाटत आहे अशीच कामगिरी करत आपण प्रत्येक यशाचे शिखर गाठीत जावे व आपणास पुढील वाटचालीस शभेच्छा.
     यावेळी संस्थेचे अध्यक्ष नारायण  सोळंके, संस्थेचे कर्याध्यक्ष गणेश सोळंके, संस्था सचिव छाया बागल, मुख्याध्यापक साम वर्गीस, क्रिडा शिक्षक विजय चव्हाण व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते व सर्वांनी पुढील वाटचालीसाठी आणि स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत