सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान च्या वतीने आदिवासी कनिष्ठ महाविद्यालय पाडळी येथे विद्यार्थ्यांना ब्लॅंकेट, शाळेची बॅग व शालेय साहित्य वाटप

परतूर प्रतीनिधी कैलाश चव्हाण
अनु.आदिवासी कनिष्ठ महाविद्यालय पाडळी,तालुका परतुर,जिल्हा जालना येथील 100 विद्यार्थ्यांना 31 डिसेंबर 2024 रोजी जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान च्या वतीने ब्लॅंकेट,शाळेची बॅग व शालेय साहित्य वाटप करण्यात आले 
यावेळी प्रमुख उपस्थिती जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संप्रदाय जालना जिल्हा अध्यक्ष नवनाथ पवार , जिल्हा महिला अध्यक्ष सौ वर्षाताई तोटे, जिल्हा कर्नल मधुकर पवार ,जिल्हा लेफ्टनंट कर्नल सुदाम पोटे ,परतुर तालुका अध्यक्ष महादेव काळे , परतुर तालुका महिला अध्यक्ष राहीताई घरडे, जालना तालुका सामाजिक उपक्रम प्रमुख सुनील तोटे सर,परतुर तालुका ब्लड कॅम्प प्रमुख शत्रुघन, प्रदीप गारकर, तसेच भक्त शिष्य शाळेतील सर्व विद्यार्थी शाळेतील सर्व शिक्षक याप्रसंगीउपस्थित होते.
या प्रसंगी मुख्याध्यापक यांनी जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानच्या उपक्रमाबद्दल संस्थांनचे आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत