सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

प्रशांत अशोक प्रधान यांना नॅशनल युथ आयकॉन ऑफ द इयर पुरस्कार

परतूर प्रतीनीधी कैलाश चव्हाण
 प्रशांत अशोक प्रधान यांना  नॅशनल युथ आयकॉन ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे
 नुकताल महाराष्ट्र सदन न्यू दिल्ली येथे  सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पुरस्कार सोहळा पार पडला त्या सोहळ्यामध्ये  श्रीयांश बहुउद्देशीय संस्था व नेक्स्ट ऑपॉर्च्युनिटी अकॅडमी यांचे संस्थापक व अध्यक्ष  प्रशांत अशोक प्रधान यांना त्यांच्या सामाजिक, क्रीडा ,आरोग्य, शैक्षणिक या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल नॅशनल युथ आयकॉन ऑफ द इयरइयर हा  पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
  नॅशनल पुरस्कार मिळणे ही गोष्ट माझ्यासाठी अभिमानास्पद व मला प्रेरणा देणारी आहे मी शैक्षणिक क्रिडा, सामाजिक,कला आरोग्य आणि स्किल डेव्हलपमेंट या क्षेत्रामध्ये काम करत असतो पुरस्कारामुळे अजून काम करण्याची प्रेरणा मिळत असते , मी सर्व मान्यवरांचे आभार मानतो धन्यवाद .
       प्रशांत अशोक प्रधान (श्रीयांश बहुउद्देशीय संस्था) महाराष्ट्र राज्य

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत