सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच चारित्र्य संपन्न व्हावे.ए.पि.आय. ईंगेवाड.


पाटोदा [ माव ] कैलाश चव्हाण 
शालेय जीवनात शिक्षणासोबतच बलोपासना करुन चारित्र्यसंपन्न व्यक्तिमत्व घडवावे असे प्रतिपादन आष्टी पोलिस स्टेशनचे ए.पी.आय. एस. एम. ईंगेवाड यांनी केले..
श्री समर्थ माध्यमिक विद्यालयात विद्यार्थीनीची सुरक्षितता  या समुपदेशन कार्यक्रमात मार्गदर्शन  करतांना त्यांनी विद्यार्थीनी सोबत कोणत्याही प्रकारचे गैरवर्तण चालणार नाही अशा गैरवर्तनासाठी शिक्षा म्हणुन असलेला " पोक्सा ", कायदा सहज शब्दात समजुन सांगितला.
संपुर्ण महाराष्ट्रात शालेय विद्यार्थीनीची सुरक्षितता या संदर्भात शासनाने दिशा निर्देश दिले आहेत त्याचाच एक भाग म्हणुन सदरील कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयात करण्यात आले होते.  ईंगेवाड यांनी अनेक विषयावर मार्गदर्शन  केले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्णाची ऊत्तरे देवुन प्रेरणा दिली. विद्यालयाचा संपुर्ण परीसर सि.सि.टि.व्ही च्या कक्षेत असल्यामुळे समाधान व्यक्त केले. विद्यार्थीनीच्या सुरक्षितते संदर्भात विद्यालय करीत असलेल्या कार्याचे कौतुक केले.
प्रारंभी श्री सरस्वती देवता व भारत मातेच्या प्रतिमांचे पुजन प्रमुख पाहुण्यांचे हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमास मंडळाचे ऊपाध्यक्ष  तुळशीदास खवल , कोषाध्यक्ष प्रभाकर कादे , सरपंच हरीभाऊ खवल , तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष शिवाजी कादे , ग्रा.प. सदस्य सदुभाऊ खवल ,गणेशराव खवल , लक्ष्मण शिंदे , भिमराव शिंदे. बालासाहेब नखाते , भाऊसाहेब कादे , पंडीत मुंढे ,सुरेश शिंदे , गोरख वखरे , पो.काॕ.देवळे साहेब व पो.काॕ. शिंदे मोठ्या संख्येने विद्यार्थी  ऊपस्थीत होते.
प्रास्ताविक मुख्याध्यापक सुरेश पाटोदकर तर सुत्र संचालन चत्रभुच खवल यांनी केले. सर्व कर्मचारी ऊपस्थीत होते.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत