सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

परतूरच्या शास्त्री विद्यालयात स्वयंशासन दिन साजरा


परतूर प्रतीनीधी कैलाश चव्हाण 
   येथील छत्रपती शिवाजीनगर भागातील लालबहादूर शास्त्री विद्यालयात सोमवारी स्वयंशासन दिन (स्कुल डे) उत्साहात साजरा करण्यात आला.
  या दिवशी शाळेचे सर्व कामकाज दहावीच्या विद्यार्थ्यांनी हाताळले. रोहित बळीराम राठोड या विद्यार्थ्याने मुख्याध्यापकाची जबाबदारी पार पाडली.
   दहावीच्या विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक,शिक्षक,लिपिक, सेवक या पदाची एक दिवशीय भूमिका पार पाडली.अर्थात शालेय कामकाजाचा अनुभव घेतला.
   एकूण पाच तासिका घेण्यात आल्या. त्यानंतर समारोप झाला. यावेळी विद्यार्थ्यांनी शिकवत असताना आलेले अनुभव विषद केले.विद्यार्थ्यांना दहावीचे वर्गशिक्षक रामराव पवार, हरिओम कोरके, किरण गवई व बळीराम राठोड यांनी मार्गदर्शन केले.
   यावेळी पर्यवेक्षक राजकुमार राऊत यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समृद्धी गाडगे व आदिती कंठाळे यांनी संयुक्तपणे केले.यावेळी विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत