सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

अलीना शेख वजीर या 8 वर्षाच्या चिमुकलीने ठेवला आयुष्यातील पहिला रोजा..



परतुर प्रतिनीधी कैलाश चव्हाण

कल्याण कोण शहरातील  गुत्तेदार शेख वजीर यांची मुलगी 8 वर्षीय शेख अलीना या चिमुकली मुलीने माहे रमजान या पवित्र महिन्यातील पहिला रोजा पूर्ण केला आहे.कडक उन्हाळयात जिवाची लाही लाही होत असताना,अशा अवघड परिस्थितीतही माहे रमजानमध्ये पहाटे पाच ते सायंकाळी सात वाजेपर्यंत अन्न,पाणी न घेता जवळपास अखंड चौदा तासांचा रोजा (उपवास) पूर्ण केला आहे.

इस्लाम धर्मात पाच तत्वांपैकी रोजा याला विशेष महत्त्व आहे, दिवसभरात थुंकीही न गिळता पवित्र असा रोजा मुस्लिम बांधव पुर्ण करतात,असा कडक रोजा (उपवास) शेख अलीना यांने पुर्ण केला असून पहिला रोजा सोडताना इफ्तारच्या वेळी (उपवास सोडताना) हार घालण्यात आला होता,एवढया लहान वयातच तिने रमजानचा पहिला उपवास केल्याने आजोबा शेख मुसा.चुलते शेख नजीर शेख नासिर शेख राजू व मामा सैय्यद तय्यब. सैय्यद ताहेर सैय्यद मोसिन.नाना सैय्यद महाम्दली यांच्या सर्व नातेवाईकांकडून सर्वत्र कौतुक केले जात आहे.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत