सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी तहसीलदार यांना निवेदन


परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
  परभणी येथे राहणारी दहा वर्षाची चिमुरडी मुलगी भंगार वेचण्याचे काम करत होती दररोज प्रमाणे ती मुलगी भंगार वेचण्यासाठी गेली होती दिनांक 23 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारच्या सुमारास त्या बालिकेला दोन नराधमांनी बळजबरीने उचलून नेऊन कॅनल मध्ये तिच्यावर रात्रभर अत्याचार करण्यात आला आणि सकाळी ती मुलगी आली व रात्री घडलेली घटना आईला सांगितली आणि नंतर गौतम नगर येथे राहणारे यशोदीप कनकुटे व श्रवण टेकुळे या गुन्हेगार वृत्तीच्या लोकांवर गुन्हा नोंदविण्यात आला असून त्यांना कठोरात कठोर शासन झाले पाहिजेत आणि त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. प्रशासनाने यांनी हा खटला फास्ट कोर्टात चालवावा जेणेकरून महिला व मुलीवर अत्याचार करण्याचे कोणाचेही धाडस होणार नाही म्हणून प्रशासनाला विनंती आहे की आपण या प्रकरणात गांभीर्याने लक्ष देऊन हे प्रकरण हाताळावे व आरोपीला पाठीशी घालणाऱ्यांना कठोर शिक्षा म्हणजे फाशीची शिक्षा व्हावी.
नसता लहू क्रांती संघर्ष सेना या संघटनेच्या वतीने महाराष्ट्रभर आंदोलन छेडण्यात येईल.
या निवेदनावर लहू क्रांती संघर्ष सेना संस्थापक अध्यक्ष राजू जी कसबे साहेब,महाराष्ट्र संघटक विठ्ठल नाटकर, युवक प्रदेशाध्यक्ष,अशोक साबळे, जालना जिल्हाध्यक्ष,दत्ता घोडे, साहेबराव गायकवाड जिल्हाध्यक्ष धाराशिव.आनंद भारसाकळे,परतूर तालुका अध्यक्ष, सुखदेव घोडे, परतूर तालुका कार्याध्यक्ष, सतिश थोरात,सुखदेव साठे आदीच्या सह्या आहेत.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत