सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

पाडळी शिवारात शेती रस्ता करण्याची ग्रामस्थांची मागनी, गावकऱ्यांच्या वतीने तहसिलदार यांना निवेदन



परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
तालुक्यातील पारधी पाडळी येथील शिवारात शेतकऱ्यांना शेतात रस्ता करून देण्याची मागणी येतील ग्रामस्थांनी तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 
   यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की मौजे पाडळी पारधी या गावचे पुनर्वसन परतूर वाटूर रोडवर नागापूर पाटीजवळ झालेले आहे. सदरील पुनर्वसन ते जुने पाडळी गाव हें सहा किमी अंतरावर बसलेले आहे. पुनर्वसन येथील शेतकऱ्यांच्या जमिनी या जुन्या गावाजवळ आहेत. जवळपास ५०० ते ६०० एकर जमीन या रस्त्यावर वहिती करणे अवलंबून आहे. गावात जाणारा सहा किमी प्रयन्त शेतरस्ता पूर्ण खराब झाला आहे, त्या पैकी दोन किमी रस्ता झाला आहे. उर्वरित चार किमी रस्ता पूर्णपणे खराब झाला असून मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे पुनर्वसन येथिल शेतकऱ्यांना आपली शेती वहिती करण्यासाठी रस्ता नसल्याने शेतमाल वाहतून करणे व वाहतूकसाठी अडचणीत येत आहे. पावसाळ्यात रस्ता चिखलमय होत असल्यामुळे शेतकऱ्याचे हाल होत असल्याने पाडळी गावाच्या शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी चार किमी रस्ता त्वरित करुन द्यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनावर सरपंच प्रसाद काकडे , उपसरपंच शामराव काळे, ग्रामपंचायत सदस्य सचिन मस्के, भास्कर बोराडे, संदीप मस्के, रमेश काकडे, वैभव बोराडे, यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या निवेदनाच्या प्रतिलिपी आमदार बबनराव लोणीकर, जिल्हाधीकरी, उपविभागीय अधिकारी परतूर यांना दिल्या आहेत. 

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत