सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

मान्सून पूर्वतयारीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज,मोती तलाव येथे आपत्कालीन शोध व बचाव साहित्याची रंगीत तालीम संपन्न



जालना प्रतिनिधी नरेश आणा श्रीपती 
  आगामी मान्सून कालावधीच्या पार्श्वभूमीवर संभाव्य आपत्कालीन परिस्थितीला तात्काळ व प्रभावी प्रतिसाद देता यावा, तसेच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम व सज्ज राहावी यासाठी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आशिमा मित्तल
यांच्या निर्देशानुसार व जालना शहर महानगरपालिका आयुक्त
अंजली शर्मा, निवासी उपजिल्‍हाधिकारी तथा मुख्‍य कार्यकारी अधिकारी, जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरण शशिकांत हदगल यांच्या मार्गदर्शनाखाली जालना शहरातील मोती तलाव येथील विसर्जन कुंड परिसरात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग व अग्निशमन विभाग, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने आपत्कालीन शोध व बचाव साहित्याची भव्य रंगीत तालीम आयोजित करण्यात आली होती.
यावेळी जिल्हाधिकारीआशिमा मित्तल, मनपा आयुक्त अंजली शर्मा, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी दिपक काजळकर तसेच अग्निशमन अधिकारी संदीप दराडे यांची प्रमुख उपस्थिती होती. 
याशिवाय अग्निशमन विभाग, जालना, बदनापूर व अंबड येथील अधिकारी व कर्मचारी, तसेच रायगड येथे प्रशिक्षण पूर्ण करून आलेले ‘आपदा मित्र’ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
रंगीत तालीमेदरम्यान पूर, अतिवृष्टी, पाण्यात अडकलेल्या नागरिकांचा बचाव, आपत्कालीन स्थलांतरण तसेच नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी वापरण्यात येणाऱ्या अत्याधुनिक शोध व बचाव साहित्यांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. यामध्ये फायबर बोट, इन्फ्लाटेबल रबर बोट, स्कुबा सेट, फायर जेल ब्लॅंकेट, लाईफबोये, बॅटरी कटर, बॅटरी स्प्रेडर, फ्लोटींग पंप, पोर्टेबल जनरेटर, पोर्टेबल पंप, मेगाफोन, सेफ्टी नेट, लाईफ जॅकेट व रिफ्लेक्टर जॅकेट आदी साहित्यांच्या कार्यपद्धती व वापराबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच पाण्यात बुडणाऱ्या व्यक्तीचा सुरक्षितरित्या बचाव कसा करावा, पूरस्थितीत रबर बोटीद्वारे नागरिकांचे स्थलांतरण कशा पद्धतीने करावे, आपत्कालीन परिस्थितीत समन्वय साधून तात्काळ प्रतिसाद कसा द्यावा याबाबत अग्निशमन विभागामार्फत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण देण्यात आले.
मान्सून कालावधीत उद्भवणाऱ्या संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा प्रभाव कमी करण्यासाठी तसेच नागरिकांच्या जीवित व मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात येत असून, अशा प्रकारच्या रंगीत तालीम व प्रशिक्षण उपक्रमांमुळे आपत्ती प्रतिसाद यंत्रणांमध्ये समन्वय, तत्परता व कार्यक्षमता अधिक बळकट होत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.


Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत