Posts

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

दलित महासंघाच्या जालना जिल्हाध्यक्षपदी विजय जाधव यांची नियुक्ती

Image
जालना | प्रतिनिधी समाधान खरात  दलित महासंघाच्या जालना जिल्हाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते विजय दिगंबरराव जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दलित महासंघाचे संस्थापक-अध्यक्ष प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे यांनी नियुक्तीपत्र देऊन ही नियुक्ती जाहीर केली. नियुक्तीपत्रानुसार, विजय जाधव यांनी आजपर्यंत केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. दलित, वंचित, पीडित व अन्यायग्रस्त समाजघटकांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटनेच्या विचारांनुसार कार्य करावे, अशी अपेक्षा संस्थापक-अध्यक्षांनी व्यक्त केली आहे. दलित महासंघ ही महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांनी प्रेरित सामाजिक संघटना असून, समाजातील दुर्बल घटकांच्या हक्कांसाठी कार्यरत आहे. यावेळी विजय जाधव यांच्या पुढील सामाजिक व संघटनात्मक वाटचालीसाठी प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे यांनी शुभेच्छा देत त्यांच्या नियुक्तीबद्दल अभिनंदन केले.

धर्म, शील आणि संयमाचे रक्षण करणाऱ्यालाच खरा विजय लाभतो : महासती निर्मलाजी म.सा.

Image
जालना  प्रतिनिधी नरेश अण्णा श्रीपत संकटाच्या काळात धर्म, शील आणि संयमाचा त्याग न करता विवेकाने मार्गक्रमण करणाऱ्यालाच जीवनात खरा विजय प्राप्त होतो, असे प्रतिपादन तपकौमुदी उपप्रवर्तिनी महासती निर्मलाजी म.सा. यांनी धर्मसभेत केले. धर्म हा केवळ पूजा-अर्चा किंवा धार्मिक विधींमध्ये मर्यादित नसून तो प्रत्येकाच्या विचार, आचरण आणि निर्णयांमध्ये प्रतिबिंबित झाला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. प्रवचनात त्यांनी स्पष्ट केले की, लोभ, मोह, अहंकार आणि स्वार्थ या दुर्गुणांमुळे मनुष्य विवेक गमावतो आणि चुकीच्या निर्णयांकडे प्रवृत्त होतो. क्षणिक सुखाच्या मोहात घेतलेले निर्णय अनेकदा आयुष्यभर दुःख आणि पश्चात्तापाचे कारण ठरतात. त्यामुळे प्रत्येकाने आत्मसंयम, करुणा आणि सद्सद्विवेकबुद्धी जोपासून धर्ममूल्यांनुसार जीवन जगावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी एका धर्मनिष्ठ महाराणीचा प्रेरणादायी प्रसंग सांगितला. सतीत्व आणि धर्मरक्षणावर संकट ओढवले असताना महाराणीने भीती न बाळगता धैर्य, संयम आणि बुद्धिमत्तेच्या बळावर परिस्थितीचा सामना केला. धर्माशी कोणतीही तडजोड न करता विवेकपूर्ण निर्णय घेतल्या...

न्यू वंडर इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये गुरु पौर्णिमेच्या कार्यक्रम संपन्न

Image
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा  न्यू वंडर इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज परतुर मध्ये गुरुपौर्णिमा निमित्त "जीवनातील गुरुचे महत्व" या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित केली होती या स्पर्धेमध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी भाग घेतला तसेच इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनींनी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा या मंत्रावर शास्त्रीय पद्धतीने नृत्य सादर करून गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त केली.  नृत्य दरम्यान इयत्ता दहावीची विद्यार्थिनी संस्कृती संतोष झरेकर हिने जीवनातील गुरुचे महत्व सांगून शाळेतील सर्व शिक्षक वृंदाचे आभार मानले. या कार्यक्रमा दरम्यान संस्थेचे अध्यक्ष  नारायण  सोळंके ,संस्थेच्या सचिव छाया बागल तसेच व्हॉइस प्रिन्सिपल पूजा मोरे, शिक्षकवृंद व  शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूरमध्ये विविध सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न ,नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून रुग्णांना फळे व ब्लँकेट वाटप, वृक्षारोपण तसेच अनाथ बालकांना अन्नदान

Image
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा   दि. २२ जुलै : लोकनेते तथा महाराष्ट्राच्या राजकारणात जनसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे दिवंगत नेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०.०० वाजता सरकारी दवाखाना, परतूर येथे करण्यात आली. यावेळी उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळांचे वाटप  करण्यात आली. त्याचबरोबर रुग्णालय परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.  सकाळी ११.०० वाजता दृष्टी लॉयन्स, परतूर येथे रुग्णांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. गरजू व उपचाराधीन रुग्णांना आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले दुपारी १२.०० वाजता स्नेहांकुर अनाथ आश्रम येथे अनाथ व निराधार बालकांना अन्नदान करण्यात आले. बालकांसोबत प्रेमाने संवाद साधत त्यां...

सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

परतूरकरांसाठी सुवर्णसंधी : कोठाळकर हॉस्पिटलतर्फे २१ जून रोजी भव्य मोफत सर्व रोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन

Image
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा  ग्रामीण व शहरी भागातील रुग्णांना उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा एकाच छताखाली मिळाव्यात या उद्देशाने, येथील प्रसिद्ध 'कोठाळकर हॉस्पिटल क्रिटीकेअर व दातांचा दवाखाना' (आय.सी.यू. / ट्रॉमा व इमर्जन्सी सेंटर) च्या वतीने भव्य 'मोफत सर्व रोग निदान व उपचार शिबिराचे' आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर रविवार, दि २१ जून २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले असून, परिसरातील नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोठाळकर हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये जालना आणि परतूर येथील विविध रोगांवरील तज्ज्ञ व नामांकित डॉक्टर रुग्णांची मोफत तपासणी व उपचार करणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने हृदयरोग तज्ज्ञ डॉ. विष्णू एच. भुते, आर. व्ही. मेडीकेअर, जालना), मेंदू विकार तज्ज्ञ डॉ. प्रल्हाद धारूरकर, न्यूरे सर्जरी, परिनिका न्युरोकेअर, जालना), अस्थिरोग व फ्रॅक्चर तज्ज्ञ डॉ. अरविंद म्हस्के, विघ्नहर्ता हॉस्पिटल, जालना), किडनी विकार तज्ज्ञ डॉ. संदीप प. देशमुख, आशुतोष हॉस्पिटल, जालना), डॉ. सतिश चव्हाण, चव्हाण हॉस्पिटल, परतूर), डॉ. अर्जु...

परतूर लायन्स क्लबचा ११ वा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न! अध्यक्षपदी महेश होलानी, सचिवपदी कैलास तांगडे तर कोषाध्यक्षपदी नरपत जांगीड यांची निवड

Image
 परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा  येथील मुंदडा फंक्शन हॉलमध्ये परतूर लायन्स क्लबचा ११ वा दिमाखदार पदग्रहण सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यात क्लबच्या आगामी वर्षाच्या अध्यक्षपदाची सूत्रे महेश होलानी यांच्याकडे, सचिवपदाची सूत्रे कैलास तांगडे आणि कोषाध्यक्षपदाची सूत्रे नरपत जांगीड यांच्याकडे अधिकृतपणे सोपविण्यात आली. या कार्यक्रमासाठी इन्स्टॉलेशन ऑफिसर म्हणून सेकंड सेंचुरी ॲम्बेसिडर व माजी मल्टिपल कौन्सिल चेअरमन दिलीप मोदी उपस्थित होते. तर नवीन सदस्यांना शपथ देण्यासाठी इंडक्शन ऑफिसर म्हणून रिजन चेअरपर्सन लायन जयश्री लड्डा यांनी भूमिका बजावली.  नूतन कार्यकारिणी व पदाधिकारी: या सोहळ्यात केवळ मुख्य त्रिमूर्तीच नव्हे, तर क्लबच्या इतर महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनीही शपथ घेतली: उपाध्यक्ष: राहुल सातोंनकर टेमर: संतोष शिंदे टेलर ट्विस्टर: तुकाराम उबाळे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स: डॉ. सकलेचा, डॉ. नंद, डॉ. कदम, बबनराव उन्मुखे आणि डॉ. संदीप चव्हाण.  'हे' आहेत आगामी वर्षातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प: पदभार स्वीकारल्यानंतर नवनिर्वाचित अध्यक्ष महेश होलानी यांनी आपल्य...

अपर पोलिस अधीक्षक यांची तालुका जालना पोलीस ठाणे हद्दीमध्ये खरपुडी शिवार मोठी कारवाई, खरपुडी शिवारात अवैध वाळू साठ्यावर धाड अंदाजे 300 ते 350 ब्रास वाळू जप्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात   जालना तालुक्यातील खरपुडी शिवार येथे अवैधरित्या साठवून ठेवलेल्या वाळूवर पोलिसांनी धाड टाकून मोठी कारवाई केली. सदर कारवाईदरम्यान अंदाजे ३०० ते ३५० ब्रास वाळूचा साठा आढळून आला असून पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. अवैध वाळू उपसा, वाहतूक साठवणुकीविरोधात जिल्हा पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून अशा प्रकारच्या बेकायदेशीर व्यवसायावर सातत्याने कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.  महसूल विभागाच्या समन्वयाने वाळू साठ्याचे मोजमाप करून त्याची किंमत निश्चित करण्यात येणार असून संबंधितांवर नियमानुसार योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खनन व साठवणुकीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमे अंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून, यापुढेही अशा प्रकारच्या कारवाया अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. सदरची कारवाई मा. श्री. विक्रम साळी, अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात सपोनी योगेश खटकळ, पोलीस अंमलदार गायकवाड तसेच स्थानिक गुन्हे शाख...

सिंगोना येथील मयत पांडुरंग कदम यांच्या वारसाला एसबीआय बँकेकडून ४० लाखांचा विमा धनादेश सुपूर्द,दोन हजार रुपयांच्या पॉलिसीने कुटुंबाला दिला आर्थिक आधार

Image
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा  तालुक्यातील सिंगोना येथील रहिवासी पांडुरंग अंजीराम कदम (वय ४२) यांचे गतवर्षी २३ नोव्हेंबर २०२५ रोजी सिंगोना पाटीवर झालेल्या भीषण अपघातात दुर्दैवी निधन झाले होते. त्यांनी भारतीय स्टेट बँकेची (एसबीआय) अवघ्या दोन हजार रुपयांचा प्रिमियम भरून जनरल इन्शुरन्स अपघाती विमा पॉलिसी काढली होती. त्यांच्या या अपघाती निधनानंतर बँकेने सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत अत्यंत तत्परतेने त्यांच्या वारसाला तब्बल चाळीस लाख रुपयांचा अपघाती विमा मंजूर केला.   या मंजूर विमा रक्कमेचा चाळीस लाख रुपयांचा धनादेश मयत पांडुरंग कदम यांच्या वारसदार पत्नी शिला पांडुरंग कदम यांना १० जून २०२६ रोजी परतूर येथील 'एसबीआय' मुख्य शाखेत मुख्य शाखा व्यवस्थापकांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कुटुंबाचा मुख्य आधार हरपलेल्या कदम कुटुंबाला या कठीण काळात बँकेच्या दोन हजार रुपयांच्या पॉलिसीमुळे चाळीस लाख रुपयांचे मोठे आर्थिक छत्र लाभले आहे. या विमा रक्कम धनादेश वितरणप्रसंगी बँकेचे शाखा प्रबंधक विजय राम, उपप्रबंधक हर्षवर्धन मुन, संध्या रसाळ, प्रज्वल सावंत, योगेश धानुरे, आकाश राजनकर...

मान्सून पूर्वतयारीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज,मोती तलाव येथे आपत्कालीन शोध व बचाव साहित्याची रंगीत तालीम संपन्न

Image
जालना प्रतिनिधी  नरेश आणा श्रीपती    आगामी मान्सून कालावधीच्या पार्श्वभूमीवर संभाव्य आपत्कालीन परिस्थितीला तात्काळ व प्रभावी प्रतिसाद देता यावा, तसेच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम व सज्ज राहावी यासाठी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आशिमा मित्तल यांच्या निर्देशानुसार व जालना शहर महानगरपालिका आयुक्त अंजली शर्मा, निवासी उपजिल्‍हाधिकारी तथा मुख्‍य कार्यकारी अधिकारी, जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरण शशिकांत हदगल यांच्या मार्गदर्शनाखाली जालना शहरातील मोती तलाव येथील विसर्जन कुंड परिसरात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग व अग्निशमन विभाग, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने आपत्कालीन शोध व बचाव साहित्याची भव्य रंगीत तालीम आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हाधिकारीआशिमा मित्तल, मनपा आयुक्त अंजली शर्मा, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी दिपक काजळकर तसेच अग्निशमन अधिकारी संदीप दराडे यांची प्रमुख उपस्थिती होती.  याशिवाय अग्निशमन विभाग, जालना, बदनापूर व अंबड येथील अधिकारी व कर्मचारी, तसेच रायगड येथे प्रशिक्षण पूर्ण करू...

बोव्हाईन ब्रिडींग ॲक्टची प्रभावी अंमलबजावणी करा : आयुक्त पशुसंवर्धन यांचे निर्देश

जालना प्रतिनिधी नरेश आणा श्रीपती  राज्यातील गाई-म्हशींच्या जातींमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी व प्रजनन प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने “महाराष्ट्र गोजातीय प्रजनन (विनियमन) अधिनियम, 2023” लागू केला असून, या अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश आयुक्त पशुसंवर्धन डॉ. किरण पाटील (भा.प्र.से.) यांनी अधिनस्त अधिकारी वर्गाला दिले आहेत. राज्यात या कायद्याची अंमलबजावणी दि. 5 डिसेंबर, 2024 पासून सुरू झाली आहे. कृत्रिम रेतन प्रक्रियेद्वारे उत्तम दर्जाच्या व उच्च वंशावळीच्या वळूंचा वापर करून दुधाळ जनावरांची पैदास वाढविणे तसेच प्रजनन प्रक्रियेत होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालणे हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे. या अधिनियमांतर्गत राज्यातील सर्व रेत केंद्रे, भ्रूण प्रत्यारोपण केंद्रे, कृत्रिम रेतन प्रशिक्षण संस्था व सेवा पुरवठादारांना महाराष्ट्र गोजातीय प्रजनन नियमन प्राधिकरणाकडे नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. संबंधित संस्थांना केवळ प्रमाणित व उच्च वंशावळीच्या वळूंचेच रेत प्रजननासाठी वापरण्याची परवानगी राहणार आहे. या सर्व प्रक्रियांवर देखरेख ठेवण्यासाठी ‘महाराष...

जालना जिल्ह्यासाठी 8 हजार 515 कोटींच्या वार्षिक पत आराखड्याचे प्रकाशन, पीक कर्ज, कृषी व एमएसएमई क्षेत्राला प्राधान्य,वार्षिक पत आराखड्यात बँकांची 101 टक्के उद्दिष्टपूर्ती

जालना प्रतिनिधी नरेश आणा श्रीपती   सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठीचा 8 हजार 515 कोटी रुपयांचा वार्षिक पत आराखडा (Annual Credit Plan) जिल्हास्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. जिल्हास्तरीय बँकर्स समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.  यावेळी बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री के. के. कनवारिया हे सह-अध्यक्ष म्हणून तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे एलडीओ निशांत यादव, बँक ऑफ महाराष्ट्रचे उपविभागीय प्रमुख जीवन पाटील, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक योगेश सारणीकर, श्री. कायंदे, उपनिबंधक पी.बी. वर्खेडे, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे जिल्हा व्यवस्थापक शैलेश चौधरी तसेच विविध बँका व शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी माहिती देतांना बँक ऑफ महाराष्ट्रचे अग्रणी जिल्हा व्यवस्थापक मंगेश केदार यांनी सांगितले की, मागील वर्षीचा पत आराखडा 7 हजार 770 कोटी रुपयांचा होता. त्याच्या तुलनेत यंदाच्या आराखड्यात सुमारे 10 टक्क्यांनी वाढ कर...

सोनलनगर येथे Z TV Kutumbh तर्फे महिलांसाठी विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न

Image
परतूर प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनलनगर येथील श्री संत गजानन महाराज संस्थान या परिसरात दिनाक २१ मे २०२६ गुरुवार रोजी महिलांसाठी मनोरंजन, माहिती आणि उत्साहाचा संगम ठरलेल्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन Z TV Kutumbh तर्फे करण्यात आले. हा कार्यक्रम जालना महानगर पालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती यांनी प्रभाग नऊ मधील महिलांसाठी आयोजित केला होता.या कार्यक्रमाचे सूत्र संचलन श्री अक्षय बोरुडे यांनी केले या कार्यक्रमाला परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमामध्ये झी टीव्हीवर प्रसारित होत असलेल्या लोकप्रिय मालिकांची माहिती उपस्थित महिलांना देण्यात आली. या मालिकांमधील भूमिका साकारत असलेल्या व्यक्तीवर प्रश्न विचारण्यात आले ज्या महिलांनी बरोबर उत्तर दिले त्यांना स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळाली त्या महिलांसोबत विविध स्पर्धा घेण्यात आली. मालिकांमधील सामाजिक संदेश, कौटुंबिक मूल्ये आणि मनोरंजनाचा भाग याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी महिलांनीही मालिकांविषयी आपली मते व्यक्त करत संवाद साधला. महिलांच्या मनोरंजनासाठी विविध खेळ, ...

विवेकानंद सेवा केंद्राचे शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये घवघवीत यश

Image
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा  महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे , यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व प्राथमिक व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विवेकानंद सेवा केंद्र परतुर संचलित विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर, विवेकानंद पब्लिक स्कूल परतुर, विवेकानंद प्राथमिक व माध्यमिक शाळा परतुर, विवेकानंद इंग्लिश स्कूल केंधळी मंठा, अशा 4 शाळेचे एकूण 42 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा मध्ये,विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले असून केंद्राच्या शैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती दिली आहे. या परीक्षेमध्ये एकूण 42विद्यार्थी पात्र ठरले असून विद्यार्थ्यांच्या या यशामुळे पालक, शिक्षक व संस्थेमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन, सातत्यपूर्ण सराव व शिक्षकांचे परिश्रम यामुळे हे यश मिळाले असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर एस.जी.बाहेकर साहेब, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा नगरसेवक आदरणीय संदीप दादा बाहेकर, शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय श्रीमती. शिंदे मॅडम, प्रिन्सिपल महाजन सर, दंदा...

न्यू वंडर किड्स इंग्लिश स्कूल आणि ज्यू. कॉ., च्या दोन विद्यार्थीनी शिष्यवृत्ती साठी पात्र.

Image
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा  न्यू वंडर किड्स इंग्लिश स्कूल आणि ज्यू. कॉ., इयत्ता आठवीच्या च्या दोन विद्यार्थीनी रुचिता अमर नवल आणि कार्तिकी मुक्तिराम धुमाळ 2026 यावर्षी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परिक्षेत उत्तम गुण संपादन करून शिष्यवृत्ती साठी पात्र ठरल्या आहेत. या उत्तीर्ण विद्यार्थिनींना संस्था अध्यक्ष नारायण  सोळंके, संस्थेचे कार्याध्यक्ष गणेश सोळंके, सचिव छाया बागल, प्रिन्सिपल गोविंद पाठक, वाईस प्रिन्सिपल पूजा मोरे तसेच सर्व शिक्षकवृंद आणि कर्मचारी यांनी विद्यार्थीनीना शुभेच्छा देउन कौतुकाची थाप दिली व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

तळणीतील हिंदू संमेलनात एकतेचा जागर— “हिंदू समाज एकत्र आला तरच संकटे नाहीशी होतील” ह भ प गजानन महाराज सपकाळ यांचे प्रतिपादन

Image
तळणी प्रतिनिधी रवी पाटील  आज आपल्या भारतमातेवर विविध प्रकारचे प्रहार होत असून ती पूर्णतः सुरक्षित नाही, असे स्पष्ट प्रतिपादन विदर्भ प्रांत धर्मजागरण सांस्कृतिकचे ह.भ.प. गजानन महाराज सपकाळ यांनी केले. २०१४ नंतर हिंदुत्वाचा उदय दिसून येत असला तरी हिंदू धर्मावरील संकटे पूर्णपणे संपलेली नसून ती केवळ पुढे ढकलली गेली आहेत, असे त्यांनी नमूद केले. ही संकटे पूर्णपणे नाहीशी करण्यासाठी हिंदू समाजाने एकत्र येणे ही काळाची गरज असून, त्यासाठी हिंदू संमेलनाच्या माध्यमातून जनजागृती करावी लागत असल्याचे त्यांनी सांगितले. जगाच्या पाठीवर असलेल्या या हिंदू राष्ट्रावर अनेकांनी आघात केले, तरीही “अनेकतेत एकता” या तत्त्वामुळे भारत आजही ताठ मानेने उभा आहे, असेही त्यांनी अधोरेखित केले. सनातन वैदिक हिंदू धर्माची संस्कृती ही जगासाठी आदर्श असून, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, महाराणा प्रताप, स्वातंत्र्यवीर सावरकर, सुभाषचंद्र बोस यांसारख्या महापुरुषांनी देशासाठी बलिदान दिले आहे. या भगव्या परंपरेची पताका अखंड तेवत ठेवण्यासाठी जातीपातीच्या भिंती गाडून “आपण हिंदू आहोत” ही भावना...

मंठा येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी निमित्त भव्य हिंदू संमेलन; एकतेचा, स्वदेशीचा व पर्यावरण संवर्धनाचा संदेशभव्य शोभायात्रेने शहर दुमदुमले; प्रमुख वक्ते संजय राव तालखेडकर यांचे प्रभावी मार्गदर्शन

Image
मंठा प्रतिनिधी रवी पाटील   राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त मंठा शहरात आज सकल हिंदू समाजाच्या वतीने भव्य हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले. यानिमित्ताने शहरात आकर्षक व उत्साहपूर्ण शोभायात्रा काढण्यात आली. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदवून एकात्मतेचे दर्शन घडवले. संमेलनात प्रमुख वक्ते म्हणून संजय राव तालखेडकर यांनी मार्गदर्शन करताना हिंदू संस्कृतीची वैशिष्ट्ये आणि सध्याच्या काळातील जबाबदाऱ्या अधोरेखित केल्या. “हिंदू संस्कृती ही अनादिकालापासून टिकून राहिलेली असून सततच्या आक्रमणांनंतरही ती अधिक सक्षम झाली आहे. जगाला शांततेचा संदेश देण्याचा अधिकार हिंदू समाजालाच आहे,” असे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की, “आजच्या काळात हिंदू समाजाने जाती-पातीच्या भिंती ओलांडून एकत्र येणे ही काळाची गरज आहे. 2047 पर्यंत विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाने योगदान देणे आवश्यक आहे.” स्वामी विवेकानंदांसारख्या महापुरुषांनी केलेली भविष्यवाणी आज साकार होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. परमेश्वरप्राप्तीचा अधिकार सर्वांना समान आहे, ही हिंदू धर्मा...

स्वसंस्कृतीची ओळख आणि संघटनाच परिवर्तनाचा मार्ग डाँ प्रमोद आकात यांचे दुधा येथेप्रतिपादन, संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त समाजाला आत्मभानाची गरज छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यातून एकतेचा संदेश, दूध येथे विराट हिंदू संमेलन संपन्न

Image
तळणी प्रतिनिधी रवी पाटील   तळणी येथून जवळच असलेल्या दूधा येथे आयोजित विराट हिंदू संमेलनात डॉक्टर प्रमोद आ कात यांनी मार्गदर्शन केले हिंदू समाजाने आपल्या मूळ संस्कृतीची आणि ओळखीची जाणीव ठेवणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादित केले संघाच्या शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर समाजाने आत्मपरीक्षण करून संघटनाच्या माध्यमातून परिवर्तन घडवून आणण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले कोणत्याही समाजाचे संघटन करण्यासाठी त्या समाजाला स्वतःची ओळख असणे अत्यंत गरजेचे आहे मी कोण आहे माझी संस्कृती काय माझा इतिहास कोणता आहे याची जाणीव झाल्याशिवाय खरी संघटन होऊ शकत नाही समाज परिवर्तन हे एकट्याची काम नसून संपूर्ण समाजाच्या एकत्रित प्रयत्नातूनच ते शक्य होते असे यासाठी आपल्यात समन्वय असणे गरजेचे आहे   इतिहासाचा संदर्भ देत असताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा उल्लेख करत त्यांच्या जीवनातून संघटन आणि स्वराज्याची प्रेरणा घ्यावी छत्रपती शिवाजी महाराजांसोबत जोडलेला प्रत्येक मावळा हा हिंदवी स्वराज्याचे भगवे तोरण डोलाने सतत फडकत राहावे यासाठी त्यांनी संघर्ष केला प्रभू श्रीराम आणि प्...

न्यू वंडर किड्स इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा

Image
 परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा  दिनांक 09 जानेवारी 2026 सोमवार रोजी न्यू वंडर किड्स इंग्लीश स्कूल अँड ज्यू. कॉलेज, परतूर येथे महिला दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या महिला दिनाचे उत्सवाचे उद्घाटन नगराध्यक्षा प्रियंकाताई रक्षे यांच्या हस्ते करण्यात आले सर्व प्रथम जिजामाता भोसले, रमाबाई आंबेडकर आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व फित कापून करण्यात आले. याप्रसंगी संस्था मार्गदर्शक पार्वतीबाई सोळंके, सचिव छाया बागल, प्रमुख पाहुणे उपनगराध्यक्षा विशाखा राखे, उपमुख्याध्यापिका पुजा मोरे उपस्थित होते. यावेळी महिलांनी स्वतःच्या आरोग्याचे संरक्षण कसे करावे याचे उत्तम मार्गदर्शन मीरा झरेकर यांनी केले तद्नंतर नीलिमा मसलकर पाल्याच्या संस्काराविषयी भाष्य केले. तसेच  घरकाम सांभाळून नोकरी व व्यवसाय करणाऱ्या कर्तबगार महिलांचा संस्थे तर्फे विशेष सत्कार करण्यात आला. याकार्यक्रमासाठी मुख्य अतिथी म्हणून नगरसेविका स्नेहा अग्रवाल, नगरसेविका कल्पना डहाळे, संजीवनी खालापूरे, रेवती राखे उपस्थित होते.      संस्था अध्यक्ष नारायण दादा सोळंके, मु...